![]() |
Land Property Buying Tips |
जमिनीची
खरेदी विक्री करणे, तसे कठीणच काम आहे.खरेदी किवा विक्री करते
वेळेस आपल्याला परवडेल अश्या भावामध्ये विकणे व खरीदने फार कठीण आहे.तसेच आपण मालमत्ता
खरेदी किंवा विक्री करतो त्या वेळेस आपल्याला शासकीय दृष्ट्या अनेक कामे करावी
लागतात.तेवढेच नाही तर जमीन मालमत्ता खरीदिमध्ये नुकसान व धोका होण्याची शक्यता
जास्त प्रमाणात असते.त्यामुळे आपण खरेदी किंवा विक्री करत असलेली मालमत्ता शासकीय
दृष्ट्या विकण्यास किंवा विकत घेण्यास योग्य आहे कि नाही त्यासाठी काही गोष्टी प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे आवश्यक
आहे. या गोष्टी जर जमिन खरेदी विक्री करताना तपासल्या नाही, तर
भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जमीन
खरेदी विक्री करते वेळेस खालील गोष्टी काळजीपूर्वक लक्षात घ्याव्यात.
✽जमिनीची
चतुर्सिमा
जमिनीची चतुर सीमा
म्हणजे हद्द आहे. शेजाऱ्याने बांध करण्याचे आणि बांध सरकवण्याचे प्रकार आपण ऐकले
असतील. जमिनीची हद्द सारखं क्षेत्र पूर्ण भरते की नाही याच्या बाबतीमध्ये तुम्ही
माहिती घेतली पाहिजे आणि त्याची माहिती घेणे काहीही चुकीचं नाही, यासाठी
तुम्ही जमीन व्यवस्थित मोजून चतुर सीमा प्रमाण आहे की नाही, ते
तपासणे आवश्यक आहे.
✽ जमिनीवरील
(७/१२) बोजा व न्यायप्रविष्ठ खटला
जमिनीवर कुठल्या
बँकेचे कर्ज आहे की नाही, हे तपासने फार महत्त्वाचे आहे. कारण जमीन कुठे
गहाण वगैरे ठेवून जर त्यावर पैसा वगैरे उचललेला असेल आणि तुम्हाला डुब्लिकेट
सातबारा दाखवून जमिनीची खरेदी विक्री होत असेल, तर फसवणूक
होऊ शकते. यासाठी ऑनलाईन डिजिटल सातबारा काढून क्रॉस चेक करता येऊ शकते.
✽ सातबारावर
किती जणांची नावे आहेत.(सामाईक क्षेत्र आहे का.)
सातबारा वर असणारी
व्यक्तींची एकूण नावे तपासणे देखील आवश्यक आहे. जो व्यक्ती जमीन विकत आहे
त्याच्याच नावावर सातबारा आहे का किंवा इतर काही वारसदार त्याला लावले आहेत का? तसेच
काही कुळ त्यावर लावलेले आहेत का, ती व्यक्ती हयात आहेत का
आणि हयात असताना त्यांच्यासाठी काही हरकत तर नाही ना, यासंदर्भातील
गोष्टींचा विचार तुम्ही करणे आवश्यक आहे.
✽ जमीन
आरक्षित तर नाही ना? शासनाच्या योजनेतून मिळालेली आहे
का ?
काही जमिनींना हिरवा
पट्टा किंवा पिवळा पट्टा इत्यादी गोष्टी आरक्षित करते. जर जमीन या आरक्षित
प्रकारातील आहे. तर याची चौकशी करणे फार गरजेचे आहे. कारण की ही जमीन गव्हर्मेंट
च्या ताब्यातही असू शकते म्हणजेच शासन काही जमिनींना हिवाळा पट्टा किंवा पिवळा
पट्टा लावलेला असतो.
✽
जमिनीत येण्या-जाण्यासाठी असलेला रस्ता
ही गोष्ट अत्यंत
महत्वाची आहे. याबाबच नेहमीच वाद होतात. त्यामुळे प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना
त्यामध्ये किती फुटाचा रस्ता आहे, शासन नियमानुसार त्याचा नकाशा बघून तो
रस्ता दाखवलेला असताना तो रस्ता योग्य प्रमाणे आहे का? शेतीमध्ये
बैलगाडी जाते का, रस्ता पुढे भविष्यात बंद होईल की नाही या
संदर्भातील सर्व माहिती घेणे गरजेचे असते.
❋ हे हि वाचा पी.एम.किसान हप्ता धारकांसाठी अती महत्वाचे...
अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा.