Hot Widget

Type Here to Get Search Results !

उन्हाचा पारा चढत आहे.त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी...हे करा... ! Heat Stroke

राज्यात 10 दिवस अजून पाऊस - पंजाब डख - 10 More Days of Rain in the state - Punjab Dakh
नियम पाळा...उष्माघात टाळा


नियम पाळा...उष्माघात टाळा

नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताचा (Heath Stroke) त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या कार्यक्रमादरम्यान तब्बल 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेतटाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. मृतांमध्ये आठ महिला असून बहुतांश वृद्ध आहेत. हृदयविकाराच्या समस्या आणि रक्तातील साखरेच्या पातळीतील चढउतार यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी काही रुग्ण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे वरील ए.बी. पी. माझा वरील बातमीचा अंश आहेत्यात उष्माघाताचा प्रश्न गंभीर दिसतोय जाणून घेऊ उष्माघात म्हणजेकाय?
 उष्माघात म्हणजे काय?

उष्माघात ही एक अशी स्थिती आहे जी तुमचे शरीर जास्त तापते तेव्हा उद्भवतेसामान्यत: गरम हवामानात दीर्घकाळापर्यंत संपर्क किंवा शारीरिक प्रयत्नांमुळे. तुमच्या शरीराचे तापमान १०४ अंश फॅरेनहाइट (४० अंश सेल्सिअस) किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उष्माघातडोके दुखापतीचा सर्वात घातक प्रकार होऊ शकतो. उन्हाळा असा असतो जेव्हा हा विकार सर्वात जास्त असतो. उष्माघाताने त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास उष्माघात तुमच्या मेंदूहृदयमूत्रपिंड आणि स्नायूंना झपाट्याने हानी पोहोचवू शकतो. तुम्ही उपचारासाठी जितका जास्त वेळ प्रतीक्षा कराल तितके जास्त नुकसान होईलज्यामुळे तुमची गंभीर गुंतागुंत किंवा मृत्यूची शक्यता वाढते.

स्ट्रोक सामान्यतः उद्भवतो जेव्हा एखादी व्यक्ती व्यायाम करतानाव्यायाम करत असताना आणि फक्त गरम वातावरणात बसत असताना सूर्याच्या संपर्कात जास्त वेळ येते. उष्माघातज्याला अनेकदा सनस्ट्रोक म्हणून ओळखले जातेहा एक धोकादायक आजार आहे ज्याला आपत्कालीन परिस्थिती म्हणून हाताळले पाहिजे. उपचार न केल्यास अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊ शकते. उष्माघात जितका जास्त काळ दुर्लक्षित केला जाईल तितका गंभीर होऊ शकतो. उष्माघात काही परिस्थितींमध्ये प्राणघातक ठरू शकतो.

 उष्माघात होण्याची कारणे.

1.  उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे

2.  कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणेकाच कारखान्यातील कामे करणे

3.  जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

4.  घट्ट कपड्याचा वापर करणे
अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.

 उष्माघात होण्याची लक्षणे.

1.  थकवा येणेताप येणेत्वचा कोरडी पडणे

2.  भूक न लागणेचक्कर येणेनिरुत्साही होणेडोके दुखणे

3.  रक्तदाब वाढणेमानसिक बेचैन व अस्वस्थताबेशुद्धावस्था इत्यादी

 उष्माघात झाल्यास उपचार.

1.  रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावेखोलीत पंखेकुलर ठेवावेतवातानुकुलित खोलीत ठेवावे

2.  रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत

3.  रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी

4.  रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यातआईसपॅक्ड लावावेत

5.  आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे

 उन्हामुळे मृत्यू का होतो?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

1.  आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतंया तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात.

2.  घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं,सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.

3.  पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतंत्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झालातर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

4.  जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होतेतेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

5. शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतंतेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

6.  स्नायू कडक होऊ लागतातत्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात.

7.  रक्तातलं पाणी कमी झाल्या मुळे रक्त घट्ट होतंब्लडप्रेशर अत्यंत कमी होतंमहत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

8.  माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

9.  उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावेव आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.

 

उष्माघाताचा  जास्त धोका उद्भवतो :

सापेक्ष आर्द्रता आणि हवेच्या तपमानाचे परिणाम एकत्रित केल्यावर तुम्हाला किती गरम वाटते याचे मोजमाप करणारा उष्मा निर्देशांकउष्णतेच्या थकवाशी लक्षणीयपणे जोडलेला आहे. घामाचे बाष्पीभवन 60% किंवा त्याहून अधिक सापेक्ष आर्द्रतेमुळे बाधित होतेज्यामुळे तुमच्या शरीराची थंड होण्याची क्षमता मर्यादित होते.उष्माघात हा स्ट्रोक सारखा नसतो. कोण्या व्यक्तीला उष्माघाताचा  जास्त धोका आहे :

1.  नवजात शिशु

2.  वृद्ध जे अनेक जुनाट आजारांशी संबंधित आहेत आणि कोणतीही ओव्हर-द-काउंटर औषधे घेत आहेत

3.  क्रीडापटू

4.  दिवसा उजेडात काम करणाऱ्या व्यक्ती

5.  लहान मुलेमुले किंवा पाळीव प्राणी जे कारमध्ये सोडले जातात

 

 नियम पाळा...ऊष्माघात टाळा...

 उन्हाचा पारा चढत आहे.त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी...हे करा...

1.  शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

2.  काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या.

3.  शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

4.  डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा.

5.  आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखटतेलकटमसालेदार पदार्थमद्यपान व मांसाहार टाळा.

6.  कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबतनारळपाणी याचा वापर करा.

7.  दुपारी ११ ते ४ पर्यंत कामप्रवास टाळा.

8.  लहान मुलांनागरोदर मातांनाआजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

9.  अशक्तपणा,थकवाताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास तत्काळ डाक्टरांचा सल्ला घ्या.

 उन्हाचा पारा चढत आहे...हे करू नका...

1.  लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये

2.  दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे

3.  गडदघट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे

4.  बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत

5.  उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावेतसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत






Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies